Saturday, April 28, 2012

राहुल गांधी यांनी व्यक्त केलं मुंबई हे देशाचं इंजिन ( Mumbai Engin Of India - Rahul Gandhi )

मुंबई हे देशाचं इंजिन
मुंबई हे देशाचं इंजिन
मुंबई: मुंबई हे देशाचं इंजिन असून यासारखी अनेक शहरं देशभरात निर्माण करण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
राजकरणात युवा वर्गाने जोमाने सहभाग घेण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा धरला आहे.
मुंबई ही देशाचं इंजिन आहे. पण या शहरासारखी आणखी शहरं निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी मला तुमची साथ द्या असं आवाहन राहुल गांधींनी केल आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी मुंबईत आल्यावर थेट पार्ल्याच्या भाईदास हॉलमध्ये दाखल झाले. यानंतर दुपारी दीडच्या सुमारास जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना राहुल गांधी मार्गदर्शन करण्यासाठी दादरच्या टिळभवनात पोहचले. इथे त्यांनी आपले विचार युथ पदाधिकाऱ्यांसमोर मांडले.

No comments:

Post a Comment